मंगळवार, ११ मार्च, २००८

भगीरथाचे वारस.

पाऊलखुणा
सांगली जिल्ह्यामधलं रांजणी गाव. या गावातला घरटी एक माणूस लष्करात जातो, याचा रांजणीकरांना अभिमान. ही परंपरा राखणारे बळवंतराव उर्फ नानासाहेब साळुंखे याच गावातले. ते शिपायापासून चढत चढत सुभेदार पदापर्यंत पोहोचले आणि १९४७-४८ साली लष्करी सेवेतून निवृत्त झाले. पुढं वर्षभरातच पोलीसखात्यात हवालदार म्हणून रुजू झाले.
नानासाहेब साळुंख्यांचं पहिलं अपत्य विलास्राव साळुंखे. जन्म २० फेब्रुवारी १९३७ चा. नानासाहेबांच्या बदलीच्या नोकरीमुळं विलासरावांचं प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. माध्यमिक शिक्षणाची काही वर्षं बेळगाव - सांगलीला, तर उरलेली सोलापुरला झाली.
भगीरथाचे वारस.
"पाणी पंचायती"चे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांच चरित्र.
वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: